भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरुन वाद सुरुच आहे. दरम्यान, आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत भाजपने सत्ता स्थापनेचा कोणताही दावा केला नाही. तसेच राज्यातील सत्तास्थापनेत विलंब होत असल्यामुळे कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आली असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात कायदेशीर बाबींवर चर्चा झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच पुढे काय करायचे आहे हे लवकरच ठरवू असेही पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी युतीविषयी घेतलेल्या भूमिकेवर बोलणेदेखील यावेळी टाळले.
Maharashtra BJP President, Chandrakant Patil: People of Maharashtra have given mandate to ‘Mahayuti’ (alliance). There is delay in government formation. Today, we met the Governor to discuss the legal options and political situation in the state. pic.twitter.com/GIPnqnq8Eh
— ANI (@ANI) November 7, 2019
8 नोव्हेंबर रोजी 12 वाजता विधानसभा विसर्जित होईल. त्यापूर्वी बहुमत मिळालेल्या पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करुन मंत्रीपदाची शपथ घेणे गरजेचे आहे. तरी सुध्दा राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटलेला नाही. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा सुरुच आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा नेमका कधी सुटणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.