मुंबई – कोरोनावरील लसीचा फायदा आता सर्वसामान्य जनतेला मिळत आहे. राज्यात वॅक्सीनचा कोणताही तुटवडा नाही, लसीकरणाचे काम योग्य प्रकारे सुरू आहे अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली आहे.
60 वर्षांवरील लोकांना तसेच 45 वर्षांवरील कोमॉर्बिटीज असलेल्या लोकांना ही लस देण्यात येते. या लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने त्यांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
दररोज सव्वालाख लोकांना कोरोना लसीकरण देण्यात येत आहे. तसेच हे प्रमाण वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे मात्र सराकर योग्य ते उपाय राबवत आहे, काळजी करण्याची गोष्ट नाही, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.