मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेत जात आहेत, त्या विषयी पक्षात काहींसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की भाकड गायी शिवसेना किंवा भाजपकडे जात आहेत. त्याचे आम्हाला अजिबात दु:ख नाहीं. ते म्हणाले की या पक्षांतराने आम्हाला काहीं फरक पडत नाही.
भाजप आणि शिवसेनेचे काही आमदार आमच्याही संपर्कात असून त्यांची नावेही योग्य वेळी जाहीर केली जातील असे त्यांनी नमूद केले. जुन्या नेत्यांनी जागा खाली केल्याने त्यांच्या जागी नव्या नेत्यांना संधी देऊन पक्षाला पुन्हा उभारी देऊ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कोणी काही म्हणत असले तरी महाराष्ट्रात राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.