कंपन्या जास्त नफा कमावत असल्याची ग्राहकांची भावना, सर्वेक्षणातील निष्कर्ष
पुणे – जीएसटी परिषदेने वेळोवेळी ग्राहकांकडून जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) दरात कपात केलेली आहे. मात्र, कंपन्यांनी त्या प्रमाणात वस्तूची दरकपात न केल्यामुळे ग्राहक नाराज असल्याचे वातावरण आहे.
बऱ्याच ग्राहकांनी या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारीच्या आधारावर यासंदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. सरकारने जीएसटीमध्ये जेवढ्या प्रमाणात कपात केली आहे, तेवढ्या प्रमाणात कंपन्यांनी कपात केली आहे का, याबाबत ग्राहकाचे मत काय आहे यासाठी लोकल सर्कल्स नावाच्या संस्थेने देश पातळीवर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात बऱ्याच ग्राहकांनी नकारात्मक मते नोंदविली आणि याबाबत चौकशीची गरज असल्याचे सूचित केले.
सुरुवातीच्या काळामध्ये जीएसटीचे दर बरेच होते. मात्र त्यानंतर सरकारने या दरात ग्राहकांच्या सोयीसाठी बरीच कपात केली. ही कपात ग्राहकापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जीएसटी परिषदेने केले होते. मात्र, कंपन्या या संदर्भात टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात चौकशी केल्यास या कंपन्या गरजेपेक्षा जास्त नफा कमवतात काय हे स्पष्ट होईल असे ग्राहकांना वाटते. ग्राहकांनी सामूहिक पातळीवर तक्रार केल्याशिवाय यासंदर्भात चौकशी सुरू होणार नाही. सध्या ग्राहकाकडून एकूणच मागणी कमी असल्यामुळे मालाला उठाव नसल्याने मंदी गडद झाल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणातील निष्कर्ष महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
सर्वेक्षणातील माहिती अशी