मुंबई : नागरिकत्व कांद्याबाबत (का) महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हंटले आहे. ते म्हणाले, महाआघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. सरकारमध्ये मतभेद असल्याच्या फक्त चर्चा आहेत, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे ते म्हणाले.
नागरिकत्व कायद्याबाबत सरकारची बाजू मांडताना नबाब मलिक म्हणाले, सीएए हा केंद्र सरकारचा कायदा आहे. का कायदा मंजूर करताना कोणाची काय भूमिका होती हे सर्वाना माहित आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने या कायद्याला विरोध दर्शविला होता. आता हा कायदा पारित झाला आहे. याची अंमलबजावणी राज्य सरकारच्या हाती नसून केंद्र सरकारच्या हातात आहे.
‘एनआरसी लागू होणार नाही’
एनआरसीबाबत बोलताना ते म्हणाले, महाआघाडीतील तिन्ही पक्षांनी राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. एनपीआर बाबत म्हणाले, “एनपीआरमध्ये दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. तिन्ही पक्ष यावर चर्चा करीत आहेत.” सीएए, एनआरसी आणि एनपीआर बाबत तिन्ही पक्षांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे मत नबाब मलिक यांनी मांडले.