डेहराडून – देशभरातील व्यापाऱ्यांनी यावर्षी चीनमधून येणाऱ्या राख्यांची खरेदी केली नाही. त्यामुळे दुकानांमध्ये सध्या स्वदेशी बनावटीचा राख्या दिसून येत आहेत.
केंद्र सरकारने चीनच्या शंभर ऍपवर बंदी घातली आहे. सरकारने स्वतःच्या सर्व विभागांना आयात करण्यावर मर्यादा आणल्या आहेत. याचा सर्वात जास्त परिणाम अर्थातच राख्यांवर झालेला आहे. व्यापारी स्वतः चिनी राख्या खरेदी करीत नाहीत. ग्राहकाकडूनही चिनी राख्यांसंदर्भात विचारणा होत नाही.व्यापाऱ्यांच्या संघटनेने सर्व व्यापारी सदस्यांना चिनी वस्तू घेऊ नका, असे आवाहन केलेले आहे.