मुंबई – महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची एकही घटना नोंद झाली नाही, अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. देशातील काही भागात बर्ड फ्ल्यूची साथ पसरल्याचे वृत्त आहे.
मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले, महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात बर्ड फ्ल्यूची एकही घटना नोंदवण्यात आली नाही.
देशांत मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये बर्ड फ्ल्यूमुळे काही कावळे मरून पडल्याची घटना नोंद झाली आहे. तर केरळमध्ये काही पोल्ट्रीमध्ये पक्षी या आजराने मरण पावले आहेत.