भोपाळ : ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पाठिंब्यासाठी कॉंग्रेसच्या 6 मंत्र्यांसह 22 आमदारांनी राजीनामा दिला आहे.
तर बिसाऊ लालसिंग यांनी आमदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया आज सायंकाळी सहा वाजता भारतीय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, त्यांचा मुलगा महाआर्यमान यांनी मोठे विधान केले आहे. महाआर्यमान सिंधिया यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, ‘माझ्या वडिलांनी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान आहे.
I am proud of my father for taking a stand for himself. It takes courage to to resign from a legacy. History can speak for itself when I say my family has never been power hungry. As promised we will make an impactful change in India and Madhya Pradesh wherever our future lies.
— Mahanaaryaman Scindia (@AScindia) March 10, 2020
राजीनामा देण्यासाठी धाडस लागतं. इतिहास साक्षीदार आहे की आपले कुटुंब आणि आम्हाला कधीही सत्तेची भूक नव्हती. आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे भारत आणि मध्य प्रदेशात बदल घडून आणू, असं ट्विट महाआर्यमान सिंधिया यांनी केले आहे.