नवी दिल्ली: 14 दिवसांपासून 80 जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळला नसल्याचे, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच कालपासून आजपर्यंत 491 लोक कोरोनमुक्त झाले आहेत, बरे झालेल्या एकूण लोकांची संख्या 4748 आहे.
देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1752 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 37 लोकांचा मृत्यू झाला आहे.
यानंतर, देशभरात एकूण कोरोना पॉसिटीव्हची संख्या 23,452 वर पोचली आहे, त्यापैकी 17,915 सक्रिय आहेत, 4813 लोक बरे झाले आहेत. आणि 724 जणांचा मृत्यू झाला आहे.