मुंबई – राज्य शासनाने लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, महापालिकेनेही शहरातील लॉकडाऊन वाढविला आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी आदेश काढले आहेत. दरम्यान, मागील लॉकडाऊनचे नियमच या वाढीव लॉकडाऊनमध्ये कायम राहणार असून शहरातील शुक्रवार सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 पर्यंतचा वीकेंड लॉकडाऊन कायम असणार आहे.
मात्र लॉकडाऊन असतांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमाचे पालन होतांना दिसत नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना आपले मत मांडले आहे. जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा भारतात मात्र चांगलाच उद्रेक झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला पूर्णपणे खिळखिळे करण्याचे कामच सुरु केल्याचे दिसत आहे.
ते पुढे म्हणाले,‘कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार लोकांना करत आहेत. मात्र, तरीही अनेक लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले.’
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ९९ हजार ९८८ इतकी आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २ लाख ११ हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात ३२ लाख ६८ हजार ७१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.