मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नारायण राणे यांच्या रुग्णालयाचे उद्गाटना करून गेल्यापासून कोकणातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना पक्षाकडून अमित शाहसह भाजप पक्षावर हल्लाबोल होता आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त करत शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं, अमित शाह हे खरं बोलले ते शिवसेनेला फार झोंबलं. असं म्हणत जळजळीत टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
अमित शाह यांनी शिवसेनेनं शिवसेनेला संपविण्याची भाषा केलीच नाही मात्र शिवसेनेचं चुकीचे विधानं करून राजकीय वर्तुळात वाद पेटवला आहे. शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं, अमित शाह हे खरं बोलले ते शिवसेनेला फार झोंबलं.
ते पुढे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून मविआ सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे व्यवहार चालला आहे. तो आम्ही पाच वर्षे आमच्याकडे राज्य असताना केला असता तर शिवसेना कधीच संपली असती, हे खरं आहे. आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही. सरकार सरकार आहे. जुने हिशोब काढून बसण्याचं कारण नाही. शिवसेनेला आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे.