नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा( बुधवारी दि . ३० सप्टेंबर ) दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. या घटनेमुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.
#WATCH | UP CM Yogi Adityanath should resign if he can’t ensure safety to women. I urge the Central govt to send him to his place – Gorakhnath Math. If he doesn’t like the temple, he should be given the task of Ram Temple construction: BSP chief Mayawati pic.twitter.com/tYodWKxECT
— ANI (@ANI) October 1, 2020
दरम्यान,बसपा अध्यक्ष मायावती यांनीही या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हाथरस आणि बलरामपुर घटनेतून असे लक्षात येते कि यूपीमध्ये कायद्याचे राज्य नाही तर फक्त गुंडांचे राज आहे, असा टोला मायावती यांनी योगी सरकारला लगावला आहे.
मायावती म्हणाल्या, ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांना सुरक्षा मिळू शकत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. मी केंद्रातील मोदी सरकारला विनंती करते कि त्यांनी योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या मूळ निवासस्थानी गोरखनाथ मठ येथे पाठवावे . मला १००% विश्वास आहे की, युपीचे मुख्यमंत्री सरकार चालविण्यासाठी सक्षम नाहीच, त्यामुळे योगी सरकारने आपल्या कामात बदल करावा नाही तर उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रपति राजवट लागू करावी. असं म्हणत मायावती यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी, या घटनेमुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.