अयोध्या प्रकरणावरील ओवेसींच्या वक्तव्याचा महंतांनी घेतला समाचार
नवी दिल्ली : देशातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या अयोध्येचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूनी दिला. या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी समधानी नसल्याचे सांगत न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ओवेसींनी यावर काही वक्तव्य करत न्यायालयाचा निर्णय हा सत्याचा नसून सध्यस्थितीतील आस्थेचा असल्याचे म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या याच वक्तव्यावर संत समाजातून संताप व्यक्त करण्यात येत असून ओवेसींना भारत सोडून पाकिस्तानात जावे असा सल्लादेखील महंतांनी दिला आहे.
अयोध्या प्रकरणात असदुद्दीन ओवैसी यांनी दिलेल्या वक्तव्यासंदर्भात संत समाजात संताप व्यक्त होत आहे. अखिल भारतीय अखाड़ा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हटले की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य न करणे ही देशद्रोह आहे. तसेच ओवेसी भारत आणि हिंदूंच्या विरोधात विष देतात. ओवेसी यांना भारतात हे आवडत नसेल तर त्यांनी भारत सोडून पाकिस्तानला जावे असेही नरेंद्र गिरी यांनी म्हटले आहे.
ओवेसी यांनी नेहमीच हिंदू व संतांचा अपमान केला आहे, असा आरोप महंत नरेंद्र गिरी यांनी दिला आहे. ओवेसींनी पुन्हा अशी भाषा वापरल्यास साधू संत समाज आणि अखाड़ा परिषद ती सहन करणार नाही. ते म्हणाले की जर ओवेसी यांना भारतातच रहायचे असेल तर त्यांनी भारतीय राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे पालन केले पाहिजे आणि त्यांचा आदर करावा लागेल. एवढेच नाही तर ओवेसींनी भारतात राहून जर भारताविरूद्ध वक्तव्य केले तर संत समाज त्यांना योग्य उत्तर देईल असा इशारादेखील यावेळी नरेंद्र गिरी यांनी दिला.
देशात सर्व धर्मांचे लोक राहतात. अशा परिस्थितीत जर मंदिर बांधण्यात जबरदस्तीने आणि भेदभाव केला गेला असता तर सामाजिक सौहार्द नसता आणि जातीय सलोखा बिघडला असता. विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि अखिल भारतीय आखाडा परिषद या सर्वांना राम मंदिर बांधण्याची इच्छा होती. काही मुस्लिम बाजूचे लोकसुद्धा या बाजूने होते. मग ओवेसी अशी विधाने का करीत आहेत असा सवालदेखील यावेळी त्यांनी केला.