नवी दिल्ली – भारतातील सर्व नागरिकांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे हिंदु आणि मुस्लीम यांच्यात कोणताच भेदभाव नाही, असे जे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे त्यावर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी तिरकस प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘जर हिंदु आणि मुस्लिमांचा डीएनए एक आहे, तर धर्म परिवर्तन आणि लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची काय गरज आहे ? तसेच, त्यांनी मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसींचा डीएनएदेखील एकच असल्याचे म्हटले.’
तत्पूर्वीही,मोहन भागवत यांचे विधान खरे आहे असे मानायचे असेल तर आता त्यांनी मुस्लिमांवर अत्याचार करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवून दाखवावे. असं म्हणत आपल मत मांडल होत.
दरम्यान, मोहन भागवत यांनी काल गाझियाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात बोलताना भारतातील सर्व नागरिकांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे हिंदु आणि मुस्लीम यांच्यात कोणताच भेदभाव नाही हे वक्तव्य केले होते. मोहन भागवत यांनी जी विधाने केली आहेत ती विधाने त्यांनी मोदी शहा यांनाही ऐकवली पाहिजेत, असेही दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. सरसंघालकांनी आपल्या अनुयायांना आपले हे विचार सक्तीने पाळण्याची सूचना केली पाहिजे अशी सूचनाही त्यांनी केली आहे.