नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर देशाचा अन्नदाता केंद्र सरकारने नव्या कृषी कायद्याच्या विरोधासाठी आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाल्यानंतर कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, यावर सरकारने लवकर तोडगा काढावा या मागणीसाठी आज कॉंग्रेस नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. भेटीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जर मोहन भागवत उभे राहिले तर मोदी त्यांना देखील दहशतवादी म्हणतील असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
Delhi: Congress leaders Rahul Gandhi, Ghulam Nabi Azad & Adhir Ranjan Chowdhury visit Rashtrapati Bhavan. Gandhi says, "I told the President that these farm laws are anti-farmer. The country has seen that farmers have stood up against these laws". pic.twitter.com/4Y8hsQIhgN
— ANI (@ANI) December 24, 2020
राहुल गांधींसोबत कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींनी नवे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचं सांगितलं. पुढे ते म्हणाले की, भाजपा आणि नरेंद्र मोदींचं एकच ध्येय असून ते शेतकरी आणि मजुरांना कळलं आहे. आपल्या आसपास जे दोन चार मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी पैसे उभं करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात. त्यांच्याकडे संपूर्ण भारत सोपवला आहे. जो विरोधात उभं राहतो त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी मोहन भागवत उभे राहिले तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील. थोडक्यात जो कोणी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार त्याला दहशतवादी ठरवलं जाणार, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
PM Modi is making money for the crony capitalists. Whoever will try to stand against him will be called terrorist – be it farmers, labourers and even Mohan Bhagwat: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/BnasthQBiX
— ANI (@ANI) December 24, 2020
दरम्यान, राहुल गांधी यांनी पुढे म्हटले, करोनामुळे नुकसान होणार सांगितले होते पण कोणी ऐकले नाही. आज मी पुन्हा सांगतोय की शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. जर पंतप्रधांनी कायदा मागे घेतला नाही तर फक्त भाजपा, आरएसएस नाही तर देशाचं नुकसान होणार आहे, असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला. मला पंतप्रधानांना सांगायचे आहे की, जोपर्यंत कृषी कायदे रद्द होत नाहीत तोवर शेतकरी परतणार नाहीत. सरकारने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवावं आणि हे कायदे मागे घ्यावेत. विरोधी पक्ष शेतकरी आणि मजुरांसोबत आहेत, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.