मुंबई – “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिल शाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा’, असे उपरोधिक ट्वीट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी काही दिवसांपूर्वी केलं आहे.
तसेच, आव्हाड यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यभरात गदारोळ सुरू असतानाच त्यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, आता त्यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली असून, यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यावेळी पडळकर माध्यमांशी सवांद साधत होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून नेहमीच शरद पवार बोलत आहेत. जे त्यांना बोलता येत नाही ते जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून ते बोलत आहेत. पण आव्हाडांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार मताच्या राजकारणासाठी गरळ ओकण्याचे काम जितेंद्र आव्हाड करताय.
जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर हे आव्हाड जितुद्दीन झाले असते, अजित पवार हे अजदुद्दीन आणि शरद पवार हे समशुद्दीन झाले असते.” अश्या शब्दात गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे.