गोध्रा – गुजरातमध्ये 2002 साली गोध्रा जळीतकांड झाल्यानंतर ही घटना नेहमीच चर्चेत असते. राजकीय नेते या घटनेचा संदर्भ घेत मोदी सरकावर टीकाही करतात. या घटनेवरून आजवर मोठं राजकारणही झाल्याचं पाहायला मिळत. याच घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गोध्रा जळीतकांडाविषयी एक गंभीर दावा केला आहे.
एक सभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले,’मुस्लीम समाजाने भाजपाला मतदान करू नये. मला १०० टक्के माहिती आहे की मुसलमान कमळाला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की मी आत्ता मतदान केलं, तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसलेली आहे” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ मुस्लिमांनी साबरमती ट्रेनच्या S-6 कोचला आग लावल्याने 59 कारसेवक हिंदूंचा मृत्यू झाला. याच घटनेचा संर्दभ घेत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले,“आतून पेटवला म्हणजे जो कुणी आत बसला आहे त्यानंच पेटवला असेल. दुसरं कोण पेटवणार आहे? म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथे फसवेगिरीचं फार मोठं षडयंत्र झालं आहे”, असा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.