वडूज – खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी येथील एका शेतकरी महिलेच्या बॅंकखात्यातून 43 हजारांची ऑनलाइन चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
अधिक माहिती अशी, सुर्याचीवाडी येथील सेवानिवृत्त एस.टी. चालक अंकुश माने व त्यांच्या पत्नी सौ. रंजना माने हे वाकेश्वर रस्त्यालगत वास्तव्यास आहेत. माने दांपत्य गावी जावून शेतीची कामे करीत असतात. सौ. माने यांचे येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्यावर एकूण 61 हजार 343 रूपये होते. 14 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांच्या बॅंक खात्यातून 6 हजार 623 रूपये काढण्यात आले.
त्यानंतर 19 तारखेला 25 हजार 635 रूपये काढण्यात आले. 6 डिसेंबर रोजी 3 हजार 607 रूपये, 25 डिसेंबर रोजी 4 हजार 16 रूपये तर 26 डिसेंबर रोजी 3 हजार 423 रूपये असे एकूण 43 हजार 304 रूपये काढण्यात आले. सौ. माने यांना अज्ञात क्रमांकावरून चौकशी करून हिंदी भाषेत संवाद साधून त्यांच्या क्रेडीट कार्डबाबत माहिती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय श्री. माने यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आलेले संदेश त्यांनी संयोगिनी राजकुमार कांबळे (सध्या नेमणूक शिंदेवाडी ता. खंडाळा) यांना पदाच्या समय श्रेणीतील निम्नस्तरावर (मूळ वेतनावर) आणण्याची शिक्षा संजय भागवत यांनी दिली आहे.
येरणे बुद्रुक (ता. महाबळेश्वर) येथील जिल्हा परिषद शाळेवरील उपशिक्षक विजय कुशाबा सावंत यांनी दि. 3 एप्रिल 2017 रोजी आपल्या पदाचा राजीनामा मुख्याध्यापकांकडे दिला होता. तेव्हापासून विजय सावंत कर्तव्यावर हजर नव्हते.
अनधिकृत गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. याबाबत सावंत यांच्यावर आरोप निश्चित करुन त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली होती. खासगी शिक्षण संस्थेमध्ये जास्त पगारावर नोकरीची ऑफर आल्याने शाळेत गैरहजर राहिल्याचे सावंत यांनी सुनावणी दरम्यान मान्य केले. चौकशीत विजय सावंत यांना दोषी धरत पुढील पाच वेतनवाढी कायमस्वरुपी रोखून ठेवून अनधिकृत गैरहजर कालावधी विनावेतन करण्यात येत असल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिले आहेत.
एकात्मिक बालविकास सेवा व विकास प्रकल्प खंडाळा येथील तत्कालिन प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती स्वाती सुभाष नाईक यांनी सन्मान प्रणालीमध्ये दरमहा बीटस्तरावरुन हजेरी नोंदवल्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी पडताळणी करुन ऑथोराईज्ड करणे आवश्यक आहे. तरीदेखील नाईक यांनी दुर्लक्ष केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. श्रीमती नाईक यांनी कामकाजात दुर्लक्ष केल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका फेब्रुवारी 2019 पासून मानधनापासून वंचित आहेत.
हलगर्जीपणाबद्दल श्रीमती नाईक यांना दोषी धरुन त्यांची लगतची एक वेतनवाढ एक वर्षांसाठी तात्पुरती बंद करण्याची त्यांना शिक्षा देण्यात येत असल्याचे संजय भागवत यांनी आदेशात म्हटले आहे. संजय भागवत यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी प्रशासनास शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. आता तर त्यांनी कारवाईची भूमिका घेत तिघांना शिक्षा केल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.