बारामती – 2014 मध्ये याच बारामतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्वासने दिली होती; परंतु या आश्वासनांची पूर्तता करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. याचा जाब राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व युवती कॉंग्रेस उद्या बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी सांगितले.
बेरोजगार तरुणांची फसवणूक, धनगर समाजाच्या आरक्षणाला पाच वर्षे समाजाची फसवणूक, मराठा समाजातील तरुणांची परीक्षेच्या नावाखाली, पूजा मोरेंचा आवाज दाबून केलेली शेतकऱ्यांची फसवणूक, मुस्लिम समाजाची कुचंबणा, आदी कारणावरून भाजप सरकार असफल ठरले आहे. या महाजनादेश यात्रेमध्ये लोकांच्या विरोधाला मुख्यमंत्र्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी महाजनादेश यात्रेच्या नावाखाली लोकांचा आशीर्वाद मिळत आहेत, अशा भोळ्या आशेवर मुख्यमंत्री उद्या बारामतीमध्ये येत आहेत.