मुंबई – हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांना यमुना द्रुतगती महामार्गावर अटक करण्यात आली.
त्यापूर्वी राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली आणि ते तोल जाऊन खाली पडलेही होते. आपल्यावर पोलिसांनी लाठीमार करून खाली पाडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
याच घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलतांना उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे …
‘राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं त्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारने स्वत:ची चूक कबूल करावी देशात अराजक माजलं असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत.“उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नसल्याने योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” असंही त्या म्हणाल्या आहेत.