सातारा –जावळी तालुक्यातील जलवाहिनी व व भविष्यात वरदान ठरणाऱ्या भविष्य ठरवणाऱ्या महू धरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून बाधित शेतकऱ्यांची त्याचा मोबदला न देण्याच्या कारणावरून धरण स्थळावर संबंधित शेतकऱ्यांनी धरणाचे काम बंद पाडले.
यावेळी प्रकाश किसन गोळे, शिवराम गेनू गोळे, बाजीराव गणपती गोळे, हनुमंत गणपती गोळे, शिवाजी जगन्नाथ गोळे, किसन गणपती गोळे, नितीन मोतीराम गोळे, ज्ञानदेव कुंडलिक परमाने, आनंद कुंडलिक परमाने, सर्जेराव गेनू गोळे उपस्थित होते. जावळी तालुक्यातील महू धरणाचे काम शेतकऱ्यांनी आंदोलन करून बंद पाडले. गेल्या 21 वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रकल्प धरण काही बाधित शेतकऱ्यांनी जमिनी व मोबदला न मिळाल्याच्या कारणावर सकाळी बारा वाजता धरण स्थळावर जाऊन कॅनॉलचे काम सुरू असतानाच बंद पाडले.
याप्रकरणी जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही व जर काम सुरू झाले तर याच कॅनॉलमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा व कुटुंबासह जलसमाधी घेण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी व धरणग्रस्तांनी दिला आहे. बारा वाजता धरण स्थळांवर अचानक कोणालाही माहिती न देता अचानक सुरू असणारे काम बंद पाडले जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही यावेळी कृष्णा पाटबंधारे विभागाचे अधिकारी संबंधित शेतकऱ्यांना विनंती करत लवकरात लवकर मोबदला मिळवून देण्याच्या संदर्भात बोलणी करत होते मात्र गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेळा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन बाधित शेतकऱ्यांनी कैफियत मांडून देखील त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप धरणग्रस्तांनी यावेळी केला त्यामुळे या सर्व घटनांना वैतागून अखेर बंद पडले.