पुणे – संततधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना दरवर्षीच खड्डे कसे पडतात, हे न उलगडलेले कोडे आहे. यावर फक्त सल्ला घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या 3 वर्षांत तब्बल 33 कोटी रुपयांची उधळण केली आहे. मात्र, त्यातून काहीही साध्य झालेले नाही. या प्रकाराने वाहनचालकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असून या खड्ड्यांतील “डांबर’ नेमकं कुठं मुरतंय, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. रस्त्यांची “गोल-गोल’ कामे अशीच सुरू राहिली, तर पुणे शहर “स्मार्ट’ होणार तरी कसे?
(छायाचित्रे : सूर्यकांत गावडे)