नवी दिल्ली – आपल्याच पत्नीसोबत दुसऱ्यांदा लग्न करण्याची किमया एका बहाद्दराने करून दाखवली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकून पत्नीने पतीला सोडून दिल होत. पतीला ज्यासाठी सोडलं तो महिलेचा भाचाच होता. परंतु काही दिवसातच भाचा या महिलेला सोडून पळून गेला. त्यानंतर एकट्या पडलेल्या पत्नीचा पहिल्या पटीने पुन्हा एकदा स्वीकार करत तिच्याशी विवाह केला. बिहारमधील ही खळबळजनक घटना आहे.
बिहारच्या खडगीया जिल्ह्यातील हा सर्व प्रकार आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या याच प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. महिलेने भाच्यावर प्रेम असलयाचे सांगत नवरा डब्लू शर्माला घडस्फोट दिला. यानंतर भाचा संतोष कुमारसोबत स्वइच्छेने विवाह केला. या विवाहासाठी दोघांचे कुटुंबीय देखील हजर होते. महिला आणि भाच्याला गावकऱ्यांनी नको त्या अवस्थेत पकडल्याने पतीनेच त्यांचा विवाह लावून दिल्याचे देखील बोलले जात आहे.
महिला आणि भाचा संतोष कुमार लग्न केल्यानंतर आपल्या घरी गेले. त्यानंतर संतोष कुमारच्या घरच्यांनी या प्रकाराला जोरदार विरोध करायला सुरुवात केली. संतोष कुमार याला कंटाळून घर सोडून निघून गेला. अखेर महिलेने पुन्हा एकदा आपल्या जुन्या पत्नीचे घर घाटले आणि संसारासाठी त्याची समजूत घातली. बराच वेळ दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अखेर पतीने पुन्हा एकदा आपल्या पत्नीचा स्वीकार करत तिच्याशी विवाह केला.