नेवासे – तुळशी विवाहानंतर लगीनघाईला सुरुवात होते. यंदा 20 नोव्हेंबरपासून विवाहासाठी मुहूर्त सुरु होणारा असून जून 2020 पर्यंत चालणार आहे. म्हणजेच आठ महिन्याच्या काळात 46 लग्नतिथी आहेत.
लग्नाचा बार उडवण्यासाठी अनेक वधु व वर पक्ष सज्ज झाले असून नातेवाईकांकडून सोयरिक जुळवण्यावर भर दिला जात आहे.
तुळशीविवाहनंतर विवाह धूमधडक्यात सुरवात होते. मात्र यावर्षी गुरूचा अस्त असल्याने यंदा कर्तव्य असलेल्यांना तुळशी विवाहनंतर तब्बल 27 दिवस मुहूर्ताची वाट पहावी लागणार आहे. मुहूर्तानुसार नोव्हेंबर महिन्यापासून लग्नाचा हंगाम सुरु होणार आहे. नोव्हेंबरमध्ये ज्यांनी विवाह निश्चित केले आहेत. त्यांच्याकडे पत्रिका छपाई वाजंत्री मंडप आचारी बस्त्याची तयारी सुरु आहे. 12 डिसेंबर ते 17 जानेवारी या कालावधीत गुरूचा अस्त आहे. त्यामुळे तुळशी विवाहनंतर तब्बल 27 दिवस विवाह सुरवात होणार आहे.
20 नोव्हेंबर 2019 ते 15 जून 2020 या कालावधीत विवाहाचे मुहूर्त 46 आहेत. दिवाळी सण झाल्यानंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. यावर्षी तुळशी विवाहनंतर तब्बल 9 दिवसांनी विवाह मुहूर्त प्रारंभ होणार आहे तसेच यावर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरूचा अस्त असल्यामुळे महिनाभर शुभ मुहूर्त राहणार नाहीत. विशेष म्हणजे गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी 46 शुभमुहूर्त आहेत. कार्तिक पौर्णिमेला म्हणजे दि. 12 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह होणार आहे. यानंतर 20 नोव्हेंबरपासून लग्न मुहूर्तचा योग येणार आहे. यावर्षी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात एकूण 11 मुहूर्त असल्याने वधू-वर पित्यांची आता पासूनच लगीन घाई सुरू झाली आहे. गतवर्षी गुरूचा अस्त असतांनाही 86 मुहूर्त होते, मात्र यावर्षी गुरु अस्त लग्न सराईत आल्यामुळे 46मुहूर्त आहेत.