कोलकाता – लोकसभा निवडणुकांमुळे भारताच्या अस्थिरता निर्देशांकात म्हणजे इंडिया व्हआयएक्समध्ये वाढ होऊन तो 29 या तीन वर्षाच्या उच्चांकावर गेला होता. मात्र रालोआला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर हा निर्देशांक 19.40 वर आला आहे.
याबाबत अँजेल ब्रोकिंगचे मुख्य विश्लेषक समीत चव्हाण यांनी सांगितले की, निकाल लागण्यास अगोदर निर्देशांक वाढणे अपेक्षित होते. आता निकाल चांगले लागल्यामुळे हा निर्देशांक कमी झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपले निर्णय घेणे सोपे झाले आहे.