पुणे: एचकेसी 14 वर्षाखालील करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत चिंतामणी निम्हण क्रिकेट अकादमीने आर्यन्स क्रिकेट क्लबचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
या सामन्यात मानव वैद्यने 7 बळी घेत वर्चस्व राखले. निम्हण क्रिकेट अकादमीने आर्यन्स क्रिकेट क्लबचा 5 गडी राखून पराभव केला. मानवच्या गोलंदाजीसमोर आर्यन्स क्रिकेट क्लब संघ 28.4 षटकात 130 धावांत गारद झाला.
130 धावांचे लक्ष मिहिर शहाणेच्या नाबाद 28 व सुरेंद्र शिंदेच्या 27 धावांसह चिंतामणी निम्हण क्रिकेट अकादमीने 34.5 षटकांत 5 बाद 131 धावा करून पुर्ण केले. 35 धावांत 7 गडी बाद करणारा मानव वैद्य सामनावीर ठरला.