नवी दिल्ली – अनेकदा जनजागरण करूनही केवळ 44 टक्के भारतीयच मुखपट्ट्याचा वापर करत आहेत. त्यातील निम्म्यांनीच तो निटपणे बाधलेला ासतो, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
मास्कचा वापर, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर याअटीवरच अनलॉक चारची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर एकदेश या संस्थेच्या वतीन जनजागृतीसाठी अपना मास्क मोहीम राबवली आहे. त्या मोहीमेचा भाग म्हणून हे सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात नागरिकांच्या मास्क न वापरण्याच्या कारणांचाही वेध घेण्यात आला.
मास्क नवापरण्यामागे 50 टक्के जणांचे श्वासनाला त्रास होत असल्याचे कारण आहे. तर अस्वस्थता हे 44 टक्के लोकांचे कारण आहे. तर45 टक्के जणांना सॅशल डिस्टन्सिंग पाळले तर मास्क वापरण्याची गरज नाही असे वाटते. मुख्यत: 26 ते 35 वयोगटातील नागरिकांचे मत तसे आहे.
निष्काळजीपणात 36 ते 55 वर्षाचा वयोगट सर्वात आघाडीवर आहे. त्यातील केवळ 28 टक्के नागरिकच मास्कचा वापर करतात. सुमारे 30 टक्के नागरिक कोणी जवळ आले तरच मास्कचा वापर करतात. केवळ 21 नागरिक मास्क वापरल्यावर फेसशिल्डही लावतात, असे या सर्वेक्षणअत आढळून आले आहे.