रक्तपेढीच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांनी कामात सुधारणा करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा
नगर – महानगरपालिकेच्या रक्तपेढीच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.
मनपाच्या कै.बाळासाहेब देशपांडे रूग्णालयाच्या इमारतीत असलेल्या रक्तपेढीच्या झालेल्या दुरवस्थेबाबत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बैठक बोलावली होती. यावेळी स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक महेंद्र गंधे, अजय चितळे, अजय ढोणे, मुख्य आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, महावीर कांकरिया, डॉ.राजुरकर, डॉ.शेडाळे, डॉ.मुकुंद तांदळे, डॉ.शेख, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे यांनी रक्तपेढीची झालेली दुरवस्थेचा खेद व्यक्त केला. सर्व सामान्य नागरिकांना रूग्णांना अत्यंत अल्पदरात रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने नगरपालिका असताना रक्तपेढी सुरू केली. या रक्तपेढीत लाखो रूपयाच्या नव्या मशिनरी धूळ खात पडल्या आहेत.
याबाबत डॉ.शेडाळे यांना विचारणा केली असता त्यांनी कामकाजासाठी लिपीक उपलब्ध झाल्यामुळे होल ब्लड संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे.
नागरिक रक्तदान करण्यासाठी आला तर त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत स्टोअर विभाग प्रमुख तसेच आरोग्याधिकारी यांना दिले.तसेच रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शेडाळे यांना रक्तपेढी व्यवस्थित चालविणे बाबत सूचना केल्या.
डॉ.सतीष राजूरकर यांच्याकडे बाळासाहेब देशपांडे या दवाखान्याची जबाबदारी असून त्या दवाखान्याचे कामकाज व्यवस्थित चालू असलयाबाबत त्यांनी सांगितले. रक्तपेढीची जबाबदारी सहा महिन्या करिता डॉ.राजूरकर यांच्याकडे प्रशासनाने देण्याबाबत कार्यवाही करावी.