नवी दिल्ली – लॉकडाऊनचा परिणाम संपुष्टात येऊन बॅंकांची उलाढाल पूर्ववत होऊ लागली असल्याचा दावा एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी केला.
ग्राहकांनीही मनातील नकारात्मकता काढून कर्ज घेण्याचे आणि ठेवी ठेवण्याचे काम पूर्ववत करावे. करोना आपल्यासोबत काही काळ राहणार आहे. दरम्यानच्या काळात आपण नव्या उमेदीने काम चालू ठेवण्याची गरज आहे, बॅंकांनी उत्सवाच्या काळात आपली उलाढाल वाढावी याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत.
एचडीएफसी बॅंकेने ग्राहकांसाठी काही योजना आणल्या आहेत. ग्राहकांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्या 3 महिन्यांपासून ग्राहकांनी आपले काम नियमित सुरू आहे. उत्सवाच्या काळात यात आणखी वाढ होईल.
सप्टेंबर महिन्यात आमची 80 ते 90 टक्के उलाढाल पूर्ववत झाली असल्याचे ते म्हणाले. गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी थांबली होती. आता ती वेगात वाढण्याची शक्यता आहे.