नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरी प्रकरणात सरकारने चौकशीचा आदेश द्यावा या मागणीसाठी विरोधकांनी आजही लोकसभेचे कामकाज हाणून पाडले. विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दिवसभरासाठी हे कामकाज तहकुब करावे लागले. काल कामकाज तहकुब होण्यापुर्वी सरकारने जनरल ईन्श्युरन्स दूरूस्ती विधेयक सभागृहात मांडले, ते आवाजी मतदानाने संमत करण्यात आले.
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते कप्तान सिंह सोलंकी यांनी वृत्त संस्थेची बोलताना पेगॅसस प्रकरणाच्या तपासाला समर्थन दर्शवत सत्य समोर आले पाहिजे ते म्हणाले,’ भारतात लोकशाही आहे. आणि ती टिकली पाहिजे. पेगॅससचा मुद्दा भारतानेच नव्हे तर परदेशातील संस्थांनी उचलून धरला आहे.
ते पुढे म्हणाले, या प्रकरणाचा पर्दाफाश होऊन हा मुद्दा तिथेच संपेल. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य बाहेर आले पाहिजे, तपास झाला पाहिजे,