कान्हे – मावळ तालुक्यता भाताचे पीक घेत असताना पूर्वी पडकई पद्धतीने केल्या जाणाऱ्या भात लागवडीच्या “केवळ आठवणी ओल्या’ अशी स्थिती दिसत आहे. भात लागवड करताना हमखास दृष्टीस पडणारे इरणे आता दुर्मिळ झाले आहे. मावळातील शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक असलेल्या इरण्याची जागा आता लास्टिक कागदाने घेतली आहे. पारंपरिक पद्धतीने इरणे आता अभावानेच दृष्टीस पडत आहे.
नाणे मावळ, पवन मावळ व आंदर मावळ असे प्रामुख्याने तीन भाग असलेल्या या तालुक्याचे भात हे मुख्य पीक आहे. काही वर्षांपुर्वी तालुक्यात भात लागवड पारंपारिक पद्धतीने केली जायची. पाच ते सहा शेतकरी कुटुंब एकत्र येऊन भात लागवड करायचे सर्वांनी मिळून ही लागवड महिन्याभरात चालायची मडकईमध्ये अवनी करताना शेतकरी गाणी व ओव्या गात तसेच गप्पागोष्टी करून हात लागवड करायचे. लागवडीसाठी शेतात बैलाच्या साह्याने चिखल केला जायचा.
दरम्यान, दुपारी एकत्र येऊन बांधावर झाडाखाली जेवण व्हायचे. त्यावेळी जेवणामध्ये कोण लोणचे असायचे कोण हा पदार्थ सूर्यफूल मीठ तेल टाकून बनवला जातो. हा पदार्थ आता पहायलादेखील मिळत नाही. तर अनेक गुराखी या इरण्याचा पावसाळ्यात हमखास वापर करायचे. आधुनिकतेमुळे शेती पद्धत बदलली आहे श्रम कमी झाले आहे. अलीकडे बहुसंख्य शेतकरी लागवडीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करत आहेत. तर भात पिकासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला जातो त्यामुळे जमिनीचा कस कमी होत असून, उत्पादनही घटत आहे.
भात लागवडीच्या वेळी पाऊस वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी पूर्वी ईरणे वापरले जायचे.आता तेही भावनेच्या दिसते ईरणे जागा प्लास्टिक कागदाने घेतली आहे कारागीर फेब्रुवारी मेपर्यंत इरणे बनवायचे काम करायचा बांबूपासून कौशल्याने या इरणाची निर्मिती केली जायची. बांबुच्या काड्यांचा सांगाडा तयार झाल्यावर त्यावर पळसाची पाने त्यावर कागद टाकून रस्सीने बांधले जायाचे. आता सुटसुटीत प्लास्टिक कागद यामुळे ईरणाची मागील अत्यंत अल्प आहे. त्यामुळे कारागिरांचा हंगामातील रोजगार बुडाला आहे.
अभावाने दर्शन : प्लॅस्टिक कागदाने घेतली जागा
पावसाळ्यात मावळा अनेक पारंपरिक वस्तू दिसून यायच्या. विशेषत: त्या भात लागवडीच्या काळात त्यांचा वापर केला जात असे. मात्र, आता या वस्तु दुर्मिळ झाल्या आहेत. जुन्या शेतकऱ्यांकडून या वस्तु आजही घरी जपून ठेवल्या आहेत.या वस्तु पाहिल्यानंतर मावळातील जीवनशैलीचा अंदाज येतो.
– अशोक गायकवाड, शेतकरी