महाविकास आघाडी सरकारवर रामदास आठवलेंची टीका
नवी दिल्ली : केद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘तीन चाकांचे सरकार जास्त काळ धावू शकणार नाही.’, असे रामदास आवठले यांनी सांगितले आहे.
Union Minister Ramdas Athawale: The three parties (Shiv Sena-NCP-Congress) have come together but I don’t think the three-wheeler can run long. I think there was requirement of a four-wheeler. #Maharashtra (1.1.20) pic.twitter.com/PGYBRi7NtK
— ANI (@ANI) January 1, 2020
एका वृत्तसंस्थेशी बोलताना रामदास आठवले यांनी ही टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु मला वाटत नाही की तीन चाकी सरकार फार काळ टिकेल. या सरकारला चार चाकांची आवश्यकता होती.’, अशी टीका रामदास आठवलेंनी केली आहे.
दरम्यान, रामदास आठवले यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी असे सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला. त्यामुळे भाजप नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले नाही. त्यानंतर शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.