हडपसर- राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेवर आलेले नसून जनाधाराशी बेइमानी करून स्वार्थासाठी सत्तेवर आलेले हे तिघाडी सरकार आहे. या सरकारमध्ये शिवसेना केवळ नावापुरती आहे.तर, भ्रष्टाचार करून खायचे काम मात्र राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. स्वार्थ जपणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही केवळ एका परिवाराची पार्टी आहे.असा शब्दात माजी जलसंपदा मंत्री प्रा.राम शिंदे यांची महाविकास आघाडी सरकारवर सडकून टिका.
काळेपडळ येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जलकुंड सेलेना पार्क पाण्याच्या टाकीचे लोकार्पण माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, कार्यक्रमाच्या संयोजिका माजी नगरसेविका विजया वाडकर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, उज्वला जंगले, मारुती तुपे, संदिप लोणकर,सुभाष जंगले, भूषण तुपे, स्वाती कुरणे, अमर गव्हाणे, गणेश घुले, वंदना कोद्रे,पोपटराव वाडकर, विकास भुजबळ ,हनुमंत घुले, बाळासाहेब घुले, अतुल तरवडे,प्रमोद सातव, अलोक गायकवाड, संदीप राऊत,इम्तियाज मोमीन,शोभा लगड, अश्विनी सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, निलेश गारडे, संजय भुजबळ, सविता हिंगणे, महेश ससाणे, सुनिल धुमाळ, प्रमोद कोद्रे, सोपान लोंढे, नंदू जाधव, शांताराम जाधव, कैलास घुले, अंकुश घुले,खंडेराव जगताप, जितेंद्र गायकवाड, राजेंद्र भिंताडे, सचिन हांडे, बबन बोराटे, सुबोध ससाणे, पांडुरंग माटे,आदिंसह सोसायटीतील सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले की कोरोनाच्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनता अडचणीत असताना मुख्यमंत्री मात्र काचेत राहिले. त्यांना कोणाचेही काहीही देणे घेणे नव्हते.यांचे मुख्यमंत्री मंत्रालयात दिड वर्षांने येतात.या उलट कोरोना काळात भाजपने सर्वांना मदत करण्याचे काम केले.
सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काय वाटेल म्हणून शिवसेना हनुमान चालिसा म्हणायला विरोध करत आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून मुळात आता शिवसेनेच्या हिंदुत्त्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे असे बोलून माजी मंत्री शिंदे यांनी माजी आमदार योगेश टिळेकर व नगरसेविका विजया वाडकर यांनी याभागात केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच महापालिका निवडणुकीत भाजपाचीच सत्ता येईल. आणि महापौर सुद्धा भाजपचाच असेल, असा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केला.
….तर विधानसभा निवडणूक लढणार नाही- योगेश टिळेकर
सय्यदनगर- ससाणे नगर रेलगेटवरील उड्डाणपूल की भुयारी मार्ग यावरून आज पुन्हा माजी आमदार योगेश टिळेकर यांनी राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले अडीच वर्षे सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेला बोंबच मारावी लागते. हे शिवसेनेचे दूर्भाग्य आहे.24 बाय 7 च्या योजनेतून सेलेना पार्क टाकीचे काम पूर्ण झाले आहे.विजया वाडकर यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.त्यामुळे नागरिकांना आता पाणी मिळत आहे.मी आमदार असताना दोन पर्यायी भुयारी मार्ग करून सत्तर टक्के वाहतुकीचा प्रश्न सोडवला आले.
अजित पवार यांच्या हस्ते भुयारी मार्गाचे भूमिपूजन झाले,पण काम कोठे सुरू झाले,असा सवाल टिळेकर यांनी उपस्थित करत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ,आमदार आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी येथील भुयारी मार्गाचे काम सुरू केले तर मी विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी मोठी घोषणा टिळेकर यांनी केली आहे.
भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की महाविकास आघाडी सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. भूमिपूजन किंवा उद्घाटन करण्यात भाजपला रस नाही. मात्र, जे काम केले आहे ते जनतेसाठी आहे आणि जनतेचा पाठिंबा भाजपला आहे.दोन अडीच वर्षांत हडपसरचा विकास खुंटला आहे. तो पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी योगेश टिळेकर यांनाच आमदार म्हणून संधी देण्याची गरज आहे.
माजी नगरसेविका विजया पोपटराव वाडकर म्हणाल्या की मी सन २०१२ ते १७ मध्ये नगरसेविका म्हणून काम केले.तेव्हा या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून सर्व्हे नं. ५३, सेलेना पार्क सोसायटी जवळ अमेनिटीस्पेसची जी जागा होती ती २५ लाख लिटर पाण्याच्या टाकीसाठी ताब्यात घेतली. रामटेकडी ते या टाकी पर्यंत पाईपलाईन टाकण्याचे ४.५ कोटीचे व ५.५ कोटीचे टाकी बांधण्याचे टेंडर काढून संबंधीत ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले. २०१७ पर्यंत टाकीचे व पाईपलाईनचे काम सत्तर टक्के झाले होते. पुढे २४ x ७ अंतर्गत शहरात टाक्या बांधण्याचे नियोजन भाजपाकडून करण्यात आले.
तेव्हा या टाकीसाठीही २४ x ७ अंतर्गत काम करण्यात आले. माजी आमदार योगेश टिळेकर व स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.व पाणी पुरवठा अधिकारी यांना कामाला गती देण्याचे आदेश देण्यात आले.त्यानंतर टाकीचे व लाईनचे काम पुर्ण केले.टाकी पर्यंतच्या पाण्याची टेस्टींग झाल्याने परिसरातील नागरिकांना पाणी मिळत आहे . सर्वांना सम-समान पाणी पुरवठा होऊन हा परिसर टॅंकर मुक्त होत असल्याने विशेष आनंद होत आहे.