नवी दिल्ली – १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सेनादलांना यश मिळाले आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर सेनादलांनी मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांविरुद्ध आघाडी उघडली होती.
या कारवाईत आतापर्यंत ६६ दहशतवाद्यांना संपवण्यात आले आहे. यापैकी २७ दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर ४५ दिवसांत जैश-ए-मोहम्मदच्या १९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. यामध्ये १८ फेब्रुवारी रोजी कमरान, ११ मार्च रोजी मुशीर अहमद खान आणि सज्जद भट या दशतवाद्यांचा देखील समावेश आहे.
Sources: Of the 66 terrorists killed in J&K this year, 27 belong to the Jaish-e-Mohammed out of which 19 were eliminated after Pulwama terror attack. pic.twitter.com/1N3uXi6sLn
— ANI (@ANI) April 22, 2019