नवी दिल्ली – ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, अश्यातच आता करोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, राज्यात 226 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. त्यामुळे राज्यात पंचसूत्री राबवण्याच्या सूचना आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ‘एच3एन2’ विषाणूचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.
या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील 2 रुग्णांचा समावेश आहे. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र करोनाच्या संकटातून सावरला आहे. पण आता या नव्या इन्फल्युएंझा व्हायरसमुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तसंच खासगी रूग्णालयांना देखील अलर्ट देण्यात आलाय.
त्यामुळे बाहेर फिरताना काळजी घ्या, शक्यतो मास्क लावूनच फिरा किंवा ज्यांना खोकला असेल अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नुकतंच विधान भवन येथे एच3एन2 आजारा विषयीची आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बद्दल सतर्कतेचा इशारा दिला