नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने पथके पाठवले आहेत. हि पथके राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्राला अहवाल सादर करणार आहेत. मात्र या पथकांवरून आता राजकारण होताना दिसत आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या पथकाला पश्चिम बंगाल सरकाने रोखल्याची माहिती मिळते आहे. पथकातील सदस्याला हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई केल्याचे पथकातील सदस्य अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं.
पथकाला राज्यातील परिस्थितीचा आढावा घ्याचा आहे. असं आमी तेथील प्रसाशनला सांगितले असताना आम्हाला बाहेर पडू दिल जात नाही असा आरोप त्यांनी केला. केंद्रातील पथकाला राज्य सरकार सहकार्य करीत नाहीत असं त्या म्हणाल्या. दरम्यान, केंद्र सरकारने चार राज्यात ६ अंतर मंत्रालयीन पथके पाठवली आहेत. हि पथके राजस्थानमधील जयपूर, महाराष्ट्रातील पुणे, पश्चिम बंगालमधील कोलकता, कलिमपोंग, जलपैगुडी, हावडा,२४ परगणा उत्तर, दार्जिलिंग, मिडणापूर पूर्व, आणि मध्य प्रदेशमधील इंदूर येथे ही पथके पाठवण्यात आली आहेत.
दरम्यान, देशभरात १८ हजार ६०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, ३ हजार २५२ जण कोरोनमुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारने २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये काही भागात सूट दिली आहे.