मुंबई – यंदाच्या मोसमात होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेसह अन्य सर्व मालिकांमध्ये सरस कामगिरीसाठी आम्ही सज्ज आहोत, असे मत भारताची स्टार महिला क्रिकेटपटू व एकदिवसीय सामन्यांच्या संघाची कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केले आहे.
न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. भारतीय महिला संघ या मालिकेसाठी रवाना होणार आहे. भारतीय संघ 9 ते 24 फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे ज्यामध्ये एक टी-20 आणि पाच एकदिवसीय सामने खेळविले जातील.
दरम्यान, न्यूझीलंडमध्ये 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान होणाऱ्या आयसीसी (ICC) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा 15 सदस्यीय महिला संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. अनुभवी कर्णधार मिताली राजकडे संघाची धुरा सोपविण्यात आली असून हरमनप्रीत कौर उपकर्णधार असेल.