नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि काही राज्यात सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असणाऱ्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यास विरोध करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायलयाने नकार दिला.
रासुका लागू करण्यासंदर्भात व्यापक आदेश काढता येणार नाही असे सांगत वकील एम. एल शर्मा यांना याचिका मागे घेण्याचे आवाहन न्या. अरूण मिश्रा आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने केले.
रासुकाचे ऊल्लंघन झाल्याच्या विशेषीकृत उल्लेखासह नवी याचिका किंवा का संदभर्अतील प्रलंबित याचिकेबाबत अंतरीम अर्ज दाखल करावा असे खंडपीठाने शर्मा यांना सुचवले.
का आणि एनआरसी विरोधात नागरिकांची सुरू असणारी निदर्शने रोखण्यासाठी रासुकाचा वापर केला जाण्याची भीती व्यकत्त करून तो कायदा लागू करण्यास विरोध केला आहे.