नवी दिल्ली – सरलेल्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने वित्तीय तूट 3.4 टक्क्यांच्या आत ठेवण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. आता सरकारने हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. किंबहुना ठरविल्यापेक्षा तूट किंचित कमी झाली असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
जाहीर आकडेवारीनुसार सरलेल्या वर्षात वित्तीय तूट तीन 3.39 टक्के इतकी राहिली आहे. सरकारने ठरविल्यापेक्षा ती थोडी कमी आहे. प्रत्यक्ष आकड्यांमध्ये सरलेल्या वर्षातील वित्तीय तूट 6.34 लाख कोटी रुपये इतकी राहिली आहे. सरकारने मात्र तूट 6.45 लाख कोटी रुपयांची होईल असे गृहीत धरले होते. बिगर कर उत्पन्न वाढल्यामुळे व सरकारने खर्च मर्यादित ठेवल्यामुळे तूट ठरवण्यापेक्षा काही प्रमाणात कमी ठेवण्यात यश मिळाल्याचे अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.