पुणे : लॉकडाऊनमुळे बाजार समितीचा मार्केट यार्डातील मुख्य बाजार, उपबाजार 18 जुलैपर्यंत बंद राहणार आहे. त्यानंतर पुढे येणाऱ्या आदेशानुसार निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला मंगळवारपासून (दि.14) सुरूवात होणार आहे. पहिले 5 दिवस लॉकडाऊन कडक असणार आहे. त्यानंतर किराणा, भाजीपाला खरेदी करण्यास सुट देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर पहिले पाच दिवस मार्केटयार्डातील मुख्य बाजारातील फळ-भाजीपाला बाजार, गूळ आणि भुसार बाजार आणि चारही उपबाजार बंद राहणार आहेत. आडते, कामगार यांच्यासह सर्व बाजार घटकांची याची नोंद घ्यावी, असे देशमुख यांनी म्हटले आहे.