मुंबई: गेली १६ दिवस सुरु असलेल्या सत्ता नाट्याबद्दल अद्यापही स्पष्टता आलेली नाही. भाजपाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. परंतु काँग्रेसची भूमिका अद्यापही तळ्यात मळ्यात असल्याने शिवसेनेनं राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. परंतु तो नाकारण्यात आला आहे. यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडूही अन्य दोन आमदारांसोबत राजभवनावर दाखल झाले होते.
Bacchu Kadu, Independent Candidate outside Raj Bhavan, Mumbai: Three of us (independent candidates) have come here. Whosoever Uddhav Sahab will decide, will be the Chief Minister. #Maharashtra pic.twitter.com/TiBqUFuufR
— ANI (@ANI) November 11, 2019
बच्चू कडू यांनी शिवसेना शंभर टक्के सरकार स्थापन करणार असून आम्हाला काही नको, शेतकरी मजुरांसाठी आम्ही शिवसेनेसोबत आहोत, अशी प्रतिक्रिय दिली आहे. यावेळी त्यांनी अपक्ष आमदार राजकुमार पटेल, राजेंद्र पाटील आपल्यासोबत असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेला सध्यातरी तीनच अपक्ष पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच शिवसेनेचे सरकार स्थापन झाले तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. तर शपथविधीबाबत अद्याप आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.