मुंबई, दि. 28 – राज्यात काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 832 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 841 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 81 हजार 640 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के आहे.
राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8,193 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच राज्यात 85 हजार 874 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1043 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,53,57,358 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66,34,444 (10.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.