मुंबई – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघडीस घेरण्यास सुरुवात केली आहे. याआधीही धनंजय मुंडे, मेहबूब शेख या प्रकरणावरून भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
राज्यात काही झालं तरी ‘चौकशी करू’ हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्यचं झालं आहे. महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र वास्तवात ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभले. तुम्ही सत्ताधारी पक्षातील नेते असाल तर तुमच्या चौकशीचे पुढे काही होत नाही, ती प्रलंबितच राहते, अशी टीका भाजपने ट्विटरवरून केली आहे.
राज्यात काही झालं तरी ‘चौकशी करू’ हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्यचं झालं आहे.महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते,मात्र वास्तवात ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभले.तुम्ही सत्ताधारी पक्षातील नेते असाल तर तुमच्या चौकशीचे पुढे काही होत नाही,ती प्रलंबितच राहते. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/IkW1qwlHpX
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोप असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना चौकशीकार गृहमंत्र्यांनी केवळ ‘चौकशी करू’ असे बोलून जणू क्लीनचिटच दिली. मेहबूब हे राष्ट्रवादीला एवढे प्रिय आहेत की, त्यांनी केक भरवल्याशिवाय जयंत पाटील यांचा वाढदिवस होत नाही!
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोप असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना चौकशीकार गृहमंत्र्यांनी केवळ ‘चौकशी करू’ असे बोलून जणू क्लीनचिटच दिली. मेहबूब हे राष्ट्रवादीला एवढे प्रिय आहेत की, त्यांनी केक भरवल्याशिवाय जयंत पाटील यांचा वाढदिवस होत नाही! pic.twitter.com/lZW4o58OSA
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021
ज्या मंत्र्याच्या अनैतिक संबंधाने राज्यात गदारोळ माजवला. त्या धनंजय मुंडे यांचे प्रकरणदेखील प्रलंबितच आहे. निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती देणे, बलात्कार यासारखे गंभीर आरोप असतानाही ‘आपला तो बाब्या’ यामुळे या प्रकरणात देखील चौकशी गृहमंत्र्यांनी प्रलंबित ठेवली आहे.
ज्या मंत्र्याच्या अनैतिक संबंधाने राज्यात गदारोळ माजवला. त्या धनंजय मुंडे यांचे प्रकरणदेखील प्रलंबितच आहे. निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती देणे, बलात्कार यासारखे गंभीर आरोप असतानाही ‘आपला तो बाब्या’ यामुळे या प्रकरणात देखील चौकशी गृहमंत्र्यांनी प्रलंबित ठेवली आहे. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/RRgSkJgusc
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021
सोशल मीडियावर टीका केली म्हणून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभियंत्याला निवासस्थानी बोलवून मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी चौकशीही प्रलंबितच आहे. पक्षप्रेमापोटी अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी.
सोशल मीडियावर टीका केली म्हणून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभियंत्याला निवासस्थानी बोलवून मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी चौकशीही प्रलंबितच आहे. पक्षप्रेमापोटी अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/hPWTbncyxJ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021
सीरम इंन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या चौकशीचे पुढे काय झाले? हे केवळ चौकशीकार गृहमंत्र्यांनाच माहित आहे. सिरमला लागलेली आग हे कोणाचे षडयंत्र होते की फक्त अपघात याची चौकशी ही अन्य चौकशींप्रमाणे प्रलंबितच राहिली!
सिरम इंन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या चौकशीचे पुढे काय झाले? हे केवळ चौकशीकार गृहमंत्र्यांनाच माहित आहे. सिरमला लागलेली आग हे कोणाचे षडयंत्र होते की फक्त अपघात याची चौकशी ही अन्य चौकशींप्रमाणे प्रलंबितच राहिली ! @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/87BxJT36GL
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021
ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, त्या भंडारा शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीची चौकशीही अद्याप प्रलंबित आहे. या आगीत जीव गमावलेल्या १० नवजात बालकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचं सोडून चौकशीकार गृहमंत्र्यांनी याचीही चौकशीही प्रलंबित ठेवली आहे, असे टीका मागून एका ट्विट करत भाजप महाराष्ट्राने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, त्या भंडारा शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीची चौकशीही अद्याप प्रलंबित आहे. या आगीत जीव गमावलेल्या १० नवजात बालकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचं सोडून चौकशीकार गृहमंत्र्यांनी याचीही चौकशीही प्रलंबित ठेवली आहे. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/CRsC0OZA0g
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021