पुणे – कोकण-गोव्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर बुधवारी काहीसा ओसरला आहे. तर, धरणांमधील विसर्गही कमी करण्यात आला होता.
कोकण, गोव्यासह पश्चिम महाराष्ट्रात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस होता. रेल्वे, रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. बुधवारी सकाळापासून हा जोर कमी झाला आहे. कोकणातसुद्धा अधूनमधून एखादी सर झाली. घाट माथ्यावर मात्र पावसाची संततधार सुरू होती. बंगालच्या उपसागरातीलकमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार असल्याने पुन्हा पावसाची शक्यता आहे. यावेळी पावसाचा जोर हा मराठवाडा आणि विदर्भात जास्त असेल, असे सांगण्यात आले