पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 1 एप्रिलपासून टोल दरवाढ होणार आहे. त्यामुळे या महामार्गावर धावणाऱ्या एस.टी.ला एका फेरीसाठी 122 रुपये जादा मोजावे लागणार असल्याने आता 797 रुपये टोल द्यावा लागणार आहे. परिणामी, एस.टी. महामंडळाला वर्षाला 4 कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे.
सध्या मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर दिवसाला एसटीच्या 750 ते 800 फेऱ्या होतात. सद्यस्थितीत मुंबई-पुणे मार्गावर एका फेरीसाठी एस.टी.ला 675 रुपये, मुंबई-पुणे-मुंबई या फेऱ्यांसाठी 1 हजार 350 रुपये टोल भरावा लागतो. मात्र, 1 एप्रिलपासून 122 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. तर, मुंबई-पुणे-मुंबई मार्गासाठी 244 रुपये जादा लागणार आहेत. या दोन फेऱ्यांसाठी 1 हजार 594 रुपये जादा लागणार आहेत. यामुळे दिवसाला एक लाख रुपयांहून अधिक पैसे टोलसाठी जाणार आहेत.
तिकीट दर तूर्तास “जैसे थे’
मुंबई-पुणे महामार्गावरील टोलमध्ये वाढ झाल्याने तिकीट दरातही काही प्रमाणात वाढ केली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सद्यस्थितीत टोल दरवाढ होऊनही तिकीट दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.