उत्तर प्रदेश – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात मायावती यांच्या बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने एकत्र येत एक नवीन राजकीय पर्याय लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लोकसभा जागांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात सपा बसपा आघाडीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. बसपाला 10 तर सपाला केवळ पाच जागांवर विजय मिळवता आला होता. 62 जागांसह उत्तर प्रदेशात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Will contest by-polls alone, but not permanent break from SP: Mayawati
Read @ANI Story | https://t.co/6rRDjnN8jX pic.twitter.com/FFIK4x3bDO
— ANI Digital (@ani_digital) June 4, 2019
अशातच आता बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकांमधील असमाधानकारक कामगिरीनंतर बहुजन समाज पक्षाची दिल्लीतील कार्यालयात एक बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये समाजवादी पक्ष ‘यादव’ मतं मिळवण्यात निष्फळ ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. लोकसभा निवडणुकांच्या बाबतीतील या कारनिमिमांसेनंतर बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षा सोबत काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र भविष्यात अखिलेश यादव ‘यादव’ मतांना आकर्षित करू शकले तर सपा-बसपा आघाडी पुन्हा एकदा पहायला मिळू शकते असं देखील मायावती यांनी म्हटलं आहे.