लखनौ – मुज्जफरनगरला झालेल्या किसान महापंचायतीत हिंदू-मुस्लीम ऐक्याचा नारा दिला गेला आहे ही एक चांगली बाब आहे. 1993 साली त्या जिल्ह्यात झालेल्या दंगलीमुळे निर्माण झालेल्या जखमा भरून येण्यास त्यामुळे मदत होणार आहे असे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी म्हटले आहे.
या संबंधात जारी केलेल्या ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, किसान महापंचायतीत दिल्या गेलेल्या हिंदु-मुस्लिम एकतेच्या नाऱ्यांमुळे अनेकांना असह्यही झाले असण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाने द्वेषाचे वातावरण तयार करून जी भूमी तयार केली होती ती भूमी या हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या नाऱ्यांमुळे भाजपसाठी निसरडी झाली आहे, असा टोमणाही त्यांनी मारला आहे. हा भाग आता त्यांच्या प्रभावाखालून निघून चालला असल्याची टिपण्णीही मायावती यांनी केली आहे.