ढाका – बुधवारपासून गेल्या 24 तासांत बांगलादेशातील पूर परिस्थिती अधिकच ढासळली आहे. रस्ते संपर्क तुटला आहे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. कुरिग्राम, गायबंधा, सुनमगंज, सिल्हेट आणि नेत्रकोना जिल्ह्यात येत्या 24 तासांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. बोगुरा, जमलापूर, फरीदापूर आणि शरियतपूर जिल्ह्यातही पूरस्थिती कायम राहील, असे पूर पूर्वानुमान आणि चेतावणी केंद्राने म्हटले आहे.
चारही प्रमुख नद्यांच्या पात्राच्या 101 ठिकाणांपैकी 57 ठिकाणी पाण्याची पातळी विलक्षण वाढली आहे. या पुराचा बांगलादेशातील 21 जिल्ह्यांमधील 2.9 दशलक्षाहून अधिक लोकांवर परिणाम झाला आहे.
संयुक्त राष्ट्रानेही या पूराबाबत चिंता व्यक्त केली आहे. येत्या काही आठवड्यांत देशातील जवळपास निम्म्या जिल्ह्यावर पूराचा परिणाम होईल, अशी भीती युनायटेड नेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटरी अफेयर्स (ओसीएए) ने व्यक्त केली आहे.