नवी दिल्ली : चिनी सैन्याच्या मुजोरीमुळे भारतीय सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पूर्व लडाखमध्ये आता तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह दौऱ्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या ४८ तासात लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या झाल्या. पडद्यामागे नेमके काय घडले ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण मोदींच्या लेह भेटीनंतर फक्त ४८ तासांमध्ये परिस्थितीत सुधारणा झाली असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
The disengagement of Indian & Chinese troops in Galwan, Ladakh has begun. This is a result of intense diplomatic, military engagement & contacts in the past 48 hours. Details are awaited. These meetings followed PM Modi's visit to Leh where a decisive & firm message was sent out.
— ANI (@ANI) July 6, 2020
पंतप्रधान मोदींच्या लेह भेटीनंतरच दोन्ही देशांचे सैन्य अधिकारी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्या. मोदींनी त्यांच्या लेह दौऱ्यातून ठोस आणि निर्णायक संदेश चीनला दिला. लेहमध्ये जवानांना संबोधित करताना त्यांनी कुठेही चीनचे नाव घेतले नाही. पण चीनने लगेचच त्यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली होती. भारत-चीन संबंधांमध्ये ज्यांचे हित दडलेले आहे, त्यांची सुद्धा लवकरात लवकर नियंत्रण रेषेवरील हा संघर्ष निवळला पाहिजे अशी भूमिका होती.
दरम्यान, कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे अंत्यत बारीक लक्ष आहे. संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तीच स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे.