कायदेशीर सल्ला घेऊन घेणार निर्णय
पुणे – “एल्गार प्रकरणात एसआयटी अर्थात विशेष चौकशी समिती नेमण्यात येऊ शकते का, अशी कायदेशीर माहिती राज्याचे महाअधिवक्ताकडे यांच्याकडून घेत आहे. त्यांनी त्यास होकार दिल्यास एसआयटी स्थापन केली जाऊ शकते,’ अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी येथे दिली.
एल्गार आणि कोरेगाव भिमाबाबत राज्य सरकार तपास करत होते. याबाबत एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्य शासनाला केली.
दुसऱ्या दिवशी केंद्राने तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग केला. त्यास आमचा ठोस विरोध होता. केंद्राने याबाबत निर्णय घेताना राज्य सरकारला विश्वासात घेणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करत केंद्रानेही एल्गार प्रकरणाचा तपास लवकरात लवकर केला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे देशमुख म्हणाले. तपास एनआयएकडे देण्यास माझा विरोध होता, पण मुख्यमंत्र्यांना माझा निर्णय डावलण्याचा अधिकार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
रिमोट यवेलेस बंद होता. ब्याटरी वयोमानाने झिजते.
दहशदवाद्यांना सोडविन्यासाठी युक्त्या वापरत आहेत.